Information technology
Tuesday, April 4, 2023
समज
RTE
आकलनिय आणि अनाकलनीय
Monday, April 3, 2023
तडजोडी
आपल्या जीवनाचा योग्य विकास हे आपल्या जगण्याचं एकमेव ध्येय असायला हवं.व्यवहार्य जीवनामध्ये अनेक तडजोडी ,जुगाड करणं हा त्या - त्या प्रसंगाची अथवा परिस्थितीची मागणी असते तसे आपण करतही असतो आणि त्यातून निसटून निघत असतो पण निसटून जरी निघालो तरी त्यातून बाहेर पडणं मात्र आपल्याकडून होत नाही.खरतर हेच होणं सर्वाधिक आवश्यक आहे.नष्ठ होणाऱ्या अल्प अस्तित्वाच्या वस्तु - साधनांनी ,इच्छांनी आपलं जीवन वेढावून गेलं आहे आणि आपण यातून वर उठण्यासाठी जो आधार घेतो तो ही साधनांचाच घेतो ही साधनं आपल्याला अजूनच विषयरसात डुंबवतात. आकर्षण आणि प्रलोभन टाळण्यासाठी फार कष्ट करायचीही आवश्यकता नाही फक्त नश्वरनिष्ठ गोष्टीचं फोलपण आणि ईश्वरनिष्ठ गोष्टींच खोलपण लक्षात घेतलं की आपला प्रवास शाश्वत मार्गानेच होणार ही खात्री आपल्या मनाला होते.हा अलौकिक अनुभव कोणी तरी सांगतं म्हणूून येणारा नाही त्याची आस आपली आपल्याच असायला हवी.जसं की मातेच्या मनात बाळाला दूध पाजण्याचा भाव तयार होतो आणि तीला पान्हा फुटतो.ही केवळ जैविक क्रिया नाही अथवा तात्पुरतं भावविभोरं होणं नाही तर तो माता आणि बाळा मधिल कधीही न तुटणारा बंध आहे.मुल कीती ही मोठं झालं आणि माता कीती ही थकली तरी माझं बाळ जेवलं का याची आस मातेलाच असते.
ईश्वरीनिष्ठेचा संस्कृती ,संस्कार याच्याशी संबंध नाही.कारण उष्ठी बोरे अर्पुन प्रभुला शबरी ने जणू ठाव पाहिला.संस्कृती आणि संस्कारांच्या निकषानुसार भिल्लीण शबरी कधीच टिकू शकली नसती पण शुद्ध भावाने ती प्रभुरामचंद्रासह अजराअमर झाहली.